Navaneet Kaur Instagram – मा.मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस याना ८ प्रमुख मागणीचे निवेदन
प्रमुख मागण्या – १. अचलपूर जिल्हा निर्मिती करावी. २. अमरावती जिल्हा सुखा दुष्काळ जाहीर करावा, अमरावती जिल्हातील शेतकऱ्यांना सरसकट प्रति एकरी ३०,०००/- हजार रुपये आर्थिक सहाय्य नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावे, ३. अमरावती जिल्हातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दयावी, तसेच शेतकऱ्यांचा ७/१२कोरा करावा, ४. अमरावती जिल्हातील अमरावती तहसीलचे विभाजन करून बडनेरा व वलगाव येथे तहसीलची स्वतंत्र इमारत मंजूर करावी, ५. अमरावती जिल्हातील व शहरातील डेंगू या आजाराने अंदाजे ५-६ लोकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ६. अमरावती जिल्हातील सिंचन प्रकल्पातील ज्या शेतकऱ्यांच्या शेती गेल्या अशा शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे शासनाने आर्थिक सहाय्य मंजूर करावे. ७. मेळघाट मधील तापी प्रकल्पामद्ये एकही गाव जावू देणार नाही, ८. अमरावती मद्ये शासकीय मेडिकल महाविदयालय मंजूर करावे या मागणीचे सौ.नवनीत रवी राणा यांनी दिले निवेदन व तशी चर्चा सुद्धा करण्यात आली | Posted on 14/Oct/2018 20:40:49